Skip to main content

Posts

३ -- पारदर्शी, उत्तरदायी सरकार प्रश्न ३६ ते ५०

तीन पारदर्शी , उत्तरदायी सरकार 36. लोकशाहीसाठी पारदर्शी सरकार महत्वाचे का ? लोकशाही पारदर्शी शासन ही मूलभूत गरज आहे . सरकार दरबारातील माहिती अचूकपणे आणि वेळच्या वेळी लोकांपर्यंत पोचत राहिली तरच कार्यकारी मंडळाच्या योग्य अयोग्य निर्णयांची , तसेच , कारवाईची जबाबदारी निश्चित ठरवता येते , त्यावरुनच आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने चांगले काम केले किंवा नाही . हे लोक ठरवू शकतात . सरकार चालवण्याचा खर्च जनताच करत असल्याने , आपल्या पैशांचा विनियोग कसा केला जातो ही माहिती लोकांना मिळणे किंवा त्यांच्या वतीने वृत्तपत्रांनी मिळवणे हा जनतेचा मूलभूत हक्क आहे . पुष्कळदा अशी माहिती मेहेरबानी म्हणून दिली जाते किंवा खर्चिक आणि वेळखाऊ मागणी आहे अशी टीका करुन टाळाटाळ केली जाते . पण आपण हे विसरतो की सरकारी माहिती जाहीर होण्याने उलट सरकारची कार्यक्षमता वाढण्यास मदतच होते . कारण कुठे फालतू खर्च झाला , कुठले धोरण चुकले , कुठे भ्रष्टाचाराला वाव मिळाला इत्यादी बाबींवर लोकांना नेमके बोट ठेवता येते आणि पढे त्याच त्या होणा - या चुका टाळता येतात . नागरी स्वातंत्र्य जपण्यासाठी सुद्धा शासकीय माहिती लोकापर
Recent posts

२ -- खुल्या आणि निर्भय निवडणुका प्रश्न १६ ते ३५

दोन खुल्या आणि निर्भय निवडणुका ( भारतातील निवडणुका लोकप्रतिनिधी कायदा 1950 अंतर्गत व एका स्वतंत्र निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जातात - अनुवादक ) 16. निवडणुकांना इतके महत्व का ? निवडणुकांना दुहेरी उद्दिष्ट असते . निवडणुकीतून आपण सरकारातील तीनपैकी दोन विभागांची निवड करीत असतो . एक म्हणजे राज्य कुणी चालवावे त्या व्यक्तींची , म्हणजे कार्यकारी मंडळाची निवड . दुसरी , ज्यांनी लोकांच्या वतीने राज्यकर्त्यांवर वचक आणि देखरेख ठेवावी , अशा लोकप्रतिनिधींची , म्हणजेच विधिमंडळाची निवड . कार्यकारी मंडळाने कसे आणि कोणते कायदे बनवावे , ते कसे राबवावे , त्यातून लोकहित साधते की नाही , त्यांत बदल करायचे असल्यास कोणते , इत्यादी बाबी लोकप्रतिनिधींनी तपासायच्या असतात .       अमेरिकेसारख्या अध्यक्षीय पद्धतीत लोकांच्याय थेट मतदानातून राष्ट्रध्यक्ष निवडतात . राज्य त्याने चालवायचे . त्यांचे मंत्री आणि सचिवालय त्याने स्वतःच नेमायचे . शिवाय विधिमंडळाच्या निवडीसाठी लोकांना आपापल्या मतदार संघातून आपला प्रतिनिधी निवडायचा आणि अशा सर्व प्रतिनिधींना मिळून अध्यक्षाच्या कामावर लक्ष ठेवायचे .            या उ